यंदा आयपीएल होणार की नाही, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. पण आता लॉकडाऊन संपल्यानंतरच आयपीएलबाबतचा पुढील निर्णय होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
करोना व्हायरसमुळे भारतातील क्रीडा स्पर्धांनाही चांगलाच धक्का बसला आहे. बीसीसीआयला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर आयपीएलही आता पुढे ढकलण्यात आले आहे. यंदाचे आयीपीएल २९ मार्चपासून सुरु होणार होते. पण करोना व्हायरसमुळे यंदाचे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
आयपीएलधील एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, " सध्याच्या घडीला आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. करोना व्हायरसमुळे आमची एक बैठकही रद्द झाली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन संपल्याशिवाय तरी काही करता येणार नाही. १४ एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे, त्यानंतरच यंदाच्या आयपीएलबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल."
सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे आयपीएल जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या गोष्टीचा धक्का बीसीसीआय, संघ मालक आ णि खेळाडूंनाही बसू शकतो. त्यामुळे आयपीएल खेळवण्याचा एक फॉर्म्युला राजस्थान रॉयन्सच्या संघाने पुढे आणला आहे. यानुसार आयपीएल ही कमी कालावधीमध्ये होऊ शकते आणि समस्याही जास्त येणार नाही, असे म्हटले जात आहे.
करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंद केला आहे. त्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी परदेशी खेळाडू तयार असले तरी त्यांना भारतामध्ये येता येणार नाही. त्यामुळे आयपीएल खेळवण्याची समस्या बिकट असल्याचे म्हटले जात आहे. पण यावर तोडगा राजस्थान रॉयल्सच्या संघाने काढलेला आहे.
राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजित बरठाकूर यांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंताग्रस्त वातावरण आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल होणार की नाही याबद्दल काही जणांच्या मनात शंका आहे. पण एक गोष्ट केली तर यंदाची आयपीएल खेळवण्यात येऊ शकते. पण त्यामध्ये फक्त भारतीय खेळाडूंचा समावेश करावा आणि सामन्यांची संख्या कमी करावी, असे केल्यास यंदाचे आयपीएल होऊ शकते. सध्याच्या घडीला परदेशी खेळाडू येणार की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे त्यावर हा पर्याय काढता येऊ शकतो आणि आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. "
करोना व्हायरसमुळे भारतातील क्रीडा स्पर्धांनाही चांगलाच धक्का बसला आहे. बीसीसीआयला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर आयपीएलही आता पुढे ढकलण्यात आले आहे. यंदाचे आयीपीएल २९ मार्चपासून सुरु होणार होते. पण करोना व्हायरसमुळे यंदाचे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
आयपीएलधील एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, " सध्याच्या घडीला आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. करोना व्हायरसमुळे आमची एक बैठकही रद्द झाली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन संपल्याशिवाय तरी काही करता येणार नाही. १४ एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे, त्यानंतरच यंदाच्या आयपीएलबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल."
सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे आयपीएल जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या गोष्टीचा धक्का बीसीसीआय, संघ मालक आ णि खेळाडूंनाही बसू शकतो. त्यामुळे आयपीएल खेळवण्याचा एक फॉर्म्युला राजस्थान रॉयन्सच्या संघाने पुढे आणला आहे. यानुसार आयपीएल ही कमी कालावधीमध्ये होऊ शकते आणि समस्याही जास्त येणार नाही, असे म्हटले जात आहे.
करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंद केला आहे. त्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी परदेशी खेळाडू तयार असले तरी त्यांना भारतामध्ये येता येणार नाही. त्यामुळे आयपीएल खेळवण्याची समस्या बिकट असल्याचे म्हटले जात आहे. पण यावर तोडगा राजस्थान रॉयल्सच्या संघाने काढलेला आहे.
राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजित बरठाकूर यांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंताग्रस्त वातावरण आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल होणार की नाही याबद्दल काही जणांच्या मनात शंका आहे. पण एक गोष्ट केली तर यंदाची आयपीएल खेळवण्यात येऊ शकते. पण त्यामध्ये फक्त भारतीय खेळाडूंचा समावेश करावा आणि सामन्यांची संख्या कमी करावी, असे केल्यास यंदाचे आयपीएल होऊ शकते. सध्याच्या घडीला परदेशी खेळाडू येणार की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे त्यावर हा पर्याय काढता येऊ शकतो आणि आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. "